
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १२ लोक घायाळ झाले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग १०७ बंद ठेवण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटले की, या आपत्तीमध्ये ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि ज्यांच्या घरांची हानी झाली आहे, त्यांना १ लाख ९ सहस्र रुपये दिले जातील. ज्यांची जनावरे घायाळ किंवा मृत झाली आहेत, त्यांनाही साहाय्य केले जाईल.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !