
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १२ लोक घायाळ झाले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग १०७ बंद ठेवण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटले की, या आपत्तीमध्ये ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि ज्यांच्या घरांची हानी झाली आहे, त्यांना १ लाख ९ सहस्र रुपये दिले जातील. ज्यांची जनावरे घायाळ किंवा मृत झाली आहेत, त्यांनाही साहाय्य केले जाईल.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !