डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १२ लोक घायाळ झाले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग १०७ बंद ठेवण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटले की, या आपत्तीमध्ये ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि ज्यांच्या घरांची हानी झाली आहे, त्यांना १ लाख ९ सहस्र रुपये दिले जातील. ज्यांची जनावरे घायाळ किंवा मृत झाली आहेत, त्यांनाही साहाय्य केले जाईल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > उत्तराखंडमध्ये पूरस्थितीमुळे ४६ जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता
उत्तराखंडमध्ये पूरस्थितीमुळे ४६ जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता
नूतन लेख
- Katipalla Mosque Stoned : काटिपळ्ळ (मंगळुरू) येथे मशिदीवर दगडफेक : ५ जणांना अटक !
- Heavy Rain Warning : १७ सप्टेंबर या दिवशी ७ राज्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी
- Nazia Elahi Khan: इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठवणार्या नाझिया इलाही खान यांना धमक्या !
- Mahoba Stone Pelting : महोबा (उत्तरप्रदेश) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिवरणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
- Aligarh : माझे कुटुंबीय मला मारून टाकतील, मला साहाय्य करा !
- झाशी (उत्तरप्रदेश) : मुसलमानांनी हिंदु महिलांना चिखलात फेकून केली मारहाण !