तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू

तमिळनाडूमधील पूरस्थिती

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे राज्यात गेल्या ५ दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या एकूण ८ जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतीवृष्टीही होऊ शकते.