येरवडा (पुणे) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मिळणार पंचगव्य उत्पादने आणि गोआधारित शेतीचे धडे !
कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश !