हिंदु धर्माची होणारी अपकीर्ती जाणा !
‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटात अभिनेते संजय दत्त यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांचे रूप एका ब्राह्मण व्यक्तीसारखे आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आणि शेंडी ठेवण्यात आल्याचे अन् हातात चाबूक असल्याचे दिसत आहे.
‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटात अभिनेते संजय दत्त यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांचे रूप एका ब्राह्मण व्यक्तीसारखे आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आणि शेंडी ठेवण्यात आल्याचे अन् हातात चाबूक असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी देहली येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्या.
बांगलादेशात शरणार्थी म्हणून रहात असलेले ११ लाख रोहिंग्या मुसलमान देशात सामाजिक समस्या निर्माण करत आहेत. ते अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.
तालिबानच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत. काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांमध्ये एकूण १४० ते १५० शीख रहातात, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली.
देशात रक्तपात झाला, तरी चालेल. आम्ही कोणत्याही किमतीत ‘अग्नीपथ’ योजना लागू होऊ देणार नाही, अशी धमकी जामतारा (झारखंड) येथील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी या योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी दिली.
काबूल (अफगाणिस्तान) येथील कर्ता परवान या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर ३ तालिबानी सैनिक घायाळ झाले.
नूपुर शर्मा प्रकरणी कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांनी भारताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कुवैत सरकारकडे केली आहे. यासाठी भारतावर सर्व प्रकारचा दबाव निर्माण करण्याची मागणी केली आहे.
पैगंबर यांच्याविषयी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तसलीम अहमद रहमानी यांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेच नूपुर शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले, असे पाकिस्तानमधील मौलाना इंजिनियर महंमद अली यांनी शर्मा यांचा बचाव करतांना सांगितले.
‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
भारतात पैगंबरांच्या कथित अवमानाच्या विरोधात बांगलादेशातील चितलमारी येथे मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून त्यांना आग लावली. हिंदूंना त्यांची घरे सोडून अन्यत्र लपावे लागले.