२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

प्रसिद्धी आणि समाजभान !

सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अन् जनता प्रयत्न करत आहेत. शासनाकडून समाजभान राखण्यासाठी वारंवार आवाहन केले जात असून समाजातील विविध क्षेत्रांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.

कोरोनाविषयीची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्‍या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.

वुहानमध्ये गेल्या ५ दिवसांत कोरोनाबाधित एकही नवीन रुग्ण नाही

चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.

विदेश दौर्‍याची माहिती शासनाला न दिल्याने हिंगोली येथे एकावर गुन्हा नोंद

विदेश दौर्‍याची माहिती लपवल्याच्या प्रकरणी येथील धामणगाव परिसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ११२ जणांवर गुन्हे नोंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात १४४ कलमान्वये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील ११२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद !

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा एक भाग म्हणून मुद्रित माध्यमांच्या वितरकांनी त्यांचे वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुढीपाडव्यापासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद करण्यात आली आहेत.

राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून त्याचे आचरण करायला लावणारी हिंदु संस्कृती !

‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. दुर्दैवाने ‘यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले..