ग्वाल्हेर येथे रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला अपघात : वैमानिकासह तिघे घायाळ

ग्वाल्हेर येथे कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला झालेल्या अपघातात वैमानिक आणि अन्य दोघे घायाळ झाले.

चीनच्या अणूबॉम्ब डागणार्‍या लढाऊ विमानांची तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी !

चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !  

‘इंडिगो’ विमानाचे कराचीत आपत्कालीन लँडिंग

भारतातील ‘इंडिगो’च्या  विमानातून प्रवास करणार्‍या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.

मुंबई विमानतळाच्या २३.५ टक्के भागाची अदानी यांच्याकडून खरेदी

‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ या आस्थापनाने परदेशातील आस्थापन ‘एसीएस्ए ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड’ यांच्याकडून हे भाग १६८५ कोटी २५ लाख रुपये इतके मूल्य देऊन खरेदी केले आहेत.

देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.

पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांच्या विमानांतून प्रवास करू नका ! – संयुक्त राष्ट्रांची त्यांच्या कर्मचार्‍यांना सूचना

आतंकवादी देश असणार्‍या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !

चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्वीट करणार्‍या वैमानिकाला ‘गोएअर’ने कामावरून काढले !

या ट्वीटवरून वाद झाल्याने मलिक यांनी ते डिलीट करत क्षमायाचनाही केली होती. ‘ट्वीटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही’, अशी क्षमा त्यांनी मागितली होती.

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उद्घाटन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात होणार

चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.