
मुंबई – राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले असून याचा अपलाभ सायबर हल्लेखोरांकडून घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वटरद्वारे केले आहे.

काही सायबर हल्लेखोर नागरिकांना दूरध्वनी करून या लसीची नोंदणी करण्यासाठी भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड आणि इतर वैयक्तिक माहिती घेऊन आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, आपली कोणतीही माहिती उघड करू नये, असे गृहमंत्री देशमुख यांनी आवाहन केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीकरणाविषयी अशा प्रकारचे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !