
बेळगाव, १८ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडून विकासाची वाटचाल चालू आहे. संपूर्ण देशाचा सर्वदृष्टीने विकास करून जगात महासत्ता बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित जनसेवक समावेश या कार्यक्रमात १७ जानेवारी या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. अमित शहा या वेळी म्हणाले की,
१. देशात चार पिढ्या सत्तेवर असतांना काँग्रेसने देशाला काय दिले ?, याचा हिशोब द्यावा. मोदी सरकारने केंद्रात सत्ता हाती घेतल्यावर ज्वलंत प्रश्न यशस्वीरित्या हाताळल्याने देशातील जनतेने भाजपला दुसर्यांदा सत्ता सोपवली.
२. काँग्रेस नेहमीच निरर्थक विरोधाचे राजकारण करते. कोरोनाच्या संदर्भात जगाला भारताची काळजी वाटत होती; मात्र केंद्र सरकारने याचा यशस्वीपणे सामना केला. जगात सर्वाधिक अल्प मृत्यूदर भारतात आहे. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. यातही काँग्रेसने खोडा घातला आहे. काँग्रेस लसीकरणाविषयी जनतेच्या मनात गैरसमज पसरवत आहे.
३. चीनसमवेत व्यावसायिक स्पर्धेसाठी भारत सज्ज झाला आहे. देशातील पहिला खिलोना क्लस्टर कर्नाटकातील कोप्पळ येथे निर्माण होत आहे. १ लाख ३२ सहस्र ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यात आल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. १३ कोटी लोकांच्या घरी केंद्र सरकारने गॅस पोचवला.
विशेष१. श्री. अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात बेळगावचा उल्लेख बेळगावी न करता बेळगाव असाच केला. यामुळे मराठी भाषिकांनी समाधान व्यक्त केले. |
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !