सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !

कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

व्हॉट्सॲप गटातील राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी पुणे विद्यापिठातील विद्यार्थ्याला मारहाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात शिकणार्‍या अनिल फुंदे या विद्यार्थ्याला व्हॉट्सॲप गटात पाठवलेली राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी अनिल फुंदे यांस लाथा-बुक्क्याने आणि आसंदी यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

‘वेदांता’ आस्थापनाला डिचोली येथील खाण क्षेत्रातून प्रतिवर्षी ३० लाख टन खनिज उत्खनन करण्याची अनुमती

गोव्यात ६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खाण व्यवसाय चालू होणार आहे. खनिज उत्खननासाठी अनुमती मिळालेले ‘वेदांता’ हे पहिले ‘लिज’धारक आस्थापन आहे.

खच्चून भरलेल्या प्रवाशांमुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये शेकडो प्रवाशांना चढताच आले नाही !

प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्‍या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.

जिल्ह्यातून १ अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठ्यांना आवाहन !

मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.

मुंबई पोलीस दलातील अधिकार्‍याच्या मुलासह महिलेला अटक !

पोलीस अधिकारी स्वत:च्या मुलांवर लक्ष ठेवू शकत नसतील, तर ते समाजातील गुन्हेगारांवर कसा वचक बसवणार ?

कराड येथे वाहनासह ७ लाख रुपयांचे अवैध मद्य शासनाधिन !

कराड पोलिसांनी मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरील गोकाक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी बोलेरो गाडीतून ७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कणसे यांना कह्यात घेण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तूट !

विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे ‘नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’ने  साजरी केली आदर्श होळी !

येथे होळी झाल्यावर दुसर्‍या दिवशी येणार्‍या-जाणार्‍या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, दूध न दिल्यास त्रास देणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती. मुलांचे या संदर्भात प्रबोधन केल्यावर त्यांनी ही प्रथा बंदी केली आणि यासाठी श्री. नवनाथ कावळे यांनी दूध उपलब्ध करून दिले.

पुण्यातील प्राचीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ३ देवतांच्या मूर्तींची चोरी !

देवतांच्या दागिन्यांसह आता देवतांच्या मूर्तींचीही सहजपणे चोरी होत आहे, ही स्थिती पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !