फरीदकोट (पंजाब) येथे गुरुद्वारामध्ये २ गटांत हिंसाचार : तिघांना अटक

दोन्ही गटांनी तलवारीद्वारे एकमेकांवर वार केले. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी टिळा लावल्याने भडकलेल्या धर्मांध शिक्षकाने मंदिर बंद करण्यास भाग पाडले !

अशी घटना घडायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंचे मंदिर बंद पाडतो. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

छत्तीसगडच्या बालाजी मंदिरात आयोजित केलेला ‘फॅशन शो’ बजरंग दलाने उधळला !

हिंदूंना स्वतःचा धर्म, तसेच ‘धर्मस्थळांचे पावित्र्य कसे राखावे ?’, याचे ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारची धर्मद्रोही कृती करतात आणि देवाच्या अवकृपेला पात्र होतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !

नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन घेता येणार !

नवरात्रोत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मुख्य दर्शन रांगेला कुठेही अडथळा न आणता ही व्यवस्था करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने ‘सशुल्क दर्शन’ योजना आखली आहे.

बलात्कार करणारे आरोपी मुसलमान असतील, तर त्यांना कमरेभर खड्ड्यात गाडून दगड मारून ठार करण्याची शिक्षा करा !

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचे आवाहन !

भारत-बांगलादेश सीमेवर सापडले  ३५९ भ्रमणभाष संच

बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले.

चंडीगड विद्यापिठातील ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित

८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक
विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांना विचारूनच कार्य करा !

‘आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून घेतले पाहिजेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अटक केलेल्या ७ जणांना केवळ एका दिवसात जामीन !

जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी २२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील ७ आरोपींना अटक करून १५ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता या सर्वांना जामीन संमत करण्यात आला. या प्रकरणातील १५ आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.