
कोलकाता – बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले. सैनिक त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसताच अंधार आणि झुडपे यांचा लाभ घेत तस्करांनी पलायन केले. नंतर झडतीच्या वेळी सैनिकांना तारबंदीजवळील खड्ड्यात ८ गठ्ठे सापडले. ‘यामध्ये विविध आस्थापनांचे ३५९ भ्रमणभाष संच होते आणि त्यांची किंमत अंदाजे ३९ लाख २९ सहस्र रुपये एवढी आहे’, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. या तस्करीत सहभागी असलेल्या अनेक तस्करांची नावे समोर आली असून त्यांच्या विरोधात बैष्णवनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच जप्त केलेले भ्रमणभाष पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
सीमा सुरक्षा दल भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. तस्करीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्यापैकी काही जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने दिली.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !