
कोलकाता – बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले. सैनिक त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसताच अंधार आणि झुडपे यांचा लाभ घेत तस्करांनी पलायन केले. नंतर झडतीच्या वेळी सैनिकांना तारबंदीजवळील खड्ड्यात ८ गठ्ठे सापडले. ‘यामध्ये विविध आस्थापनांचे ३५९ भ्रमणभाष संच होते आणि त्यांची किंमत अंदाजे ३९ लाख २९ सहस्र रुपये एवढी आहे’, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. या तस्करीत सहभागी असलेल्या अनेक तस्करांची नावे समोर आली असून त्यांच्या विरोधात बैष्णवनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच जप्त केलेले भ्रमणभाष पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
सीमा सुरक्षा दल भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. तस्करीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्यापैकी काही जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने दिली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण