आज सांगलीत अभाविपचे ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन !

अभाविप आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून सुरु होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी घेतली भेट !

या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

नवी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव करून तो शासनाकडे संमतीसाठी पाठवला होता; मात्र हा ठराव आघाडी सरकारने संमत केला नाही.

आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ७ जानेवारीला सुनावणी होणार !

‘प्रतिज्ञापत्र सादर होत नाही, तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नाही’, असे तोंडी आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी ९९ लाख रुपये व्यय करण्यात येणार आहेत.

…तर दळणवळण बंदी लागू करावी लागेल ! – किशोरी पेडणेकर, महापौर

कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० सहस्रांच्या पुढे गेली, तर मुंबईमध्ये दळणवळण बंदीचा विचार करावा लागेल, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने ! – सौ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले…

राज्यात रुग्णसंख्या वाढली, तर कठोर उपाययोजना ! – उपमुख्यमंत्री

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील काही भागांत कडक दळणवळण बंदी लागू शकते.

जळगाव येथील भाजपच्या २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस !

भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रकरण

देशातील न्यायव्यवस्थेवर अर्थसंकल्पातील १० टक्क्यांऐवजी केवळ ०.२६ टक्के व्यय केला जातो ! – अधिवक्ता जयंत जायभावे, बार काउन्सिल ऑफ इंडिया

न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पैसे व्यय करण्यामध्ये राज्यकर्त्यांची एवढी उदासीनता का, याचे उत्तर शासन आणि प्रशासन यांनी दिले पाहिजे !