पुणे येथील गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील पाडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला १ वर्षानंतरही प्रारंभ नाही !
पुलाचा आराखडा सिद्ध होऊनही पुणे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली नाही. तसेच पुलाच्या प्रस्तावित आराखड्याची संकल्पचित्रे देण्याची मागणी करूनही पी.एम्.आर्.डी.ए. कडून टाळाटाळ केली जात आहे.