निधन वार्ता
सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
बागपत (उत्तरप्रदेश) येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागील मासात ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात भारताचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘भारताकडे संपूर्ण विश्वाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आहे. भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत न्यून असूनही भारताने लसीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केले आहे.
सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !
आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.
अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती.
सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट या दिवशी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये ‘वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समान वाटा देण्यात यावा’, असे सांगितले.
सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.