निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

तामसिक आणि राजसिक पेयांपेक्षा सात्त्विकता देणारी पेये घ्या !

अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो.

आरोग्यास हानीकारक ठरणार्‍या जंक फूडच्या आहारी जाणे टाळा !

जंक फूडमुळे बुद्धीदौर्बल्य येते. शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आले आहे.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

दिवसभरात किती आणि कुठल्या वेळी पाणी प्यावे ?

तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान अन् भूक लागते. ‘तहान लागते, त्या वेळी एकाएकी गटागट पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेद सांगतो.

देहातील तमोगुणाचा लय करणारा शाकाहार स्वीकारा आणि ईश्वरापासून दूर नेणारा मांसाहार करणे टाळा !

शाक + आहार = शाकाहार. ‘शाक’ म्हणजे पवित्र. शाकाहार म्हणजे पवित्र असा आहार