‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’विषयीचे संशोधन सादर

सूर्योपासनेविषयीचे अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक भाषेत समजावून सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यासंबंधी केलेले आध्यात्मिक संशोधन सांगणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. हे संशोधन ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म-परीक्षण यांच्या साहाय्याने करण्यात आले.

आय.ए.एस् अधिकारी दांपत्य टिना डाबी आणि अथर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

हिंदु महासभेने ‘लव्ह जिहाद’ म्हणून आरोप केलेल्या आय.ए.एस्. अधिकारी टिना डाबी आणि अथर खान यांच्या विवाहाच्या २ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटासाठी येथील कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे. घटस्फोटामागील कारण समजू शकलेले नाही.

उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंधने  !

देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत.

(म्हणे) ‘मुसलमानांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असू नये, या खोटेपणावर हिंदुत्व आधारित ! – असदुद्दीन ओवैसी

‘हिंदुत्वा’ची स्वतःला हवी तशी व्याख्या करण्यात किंवा अर्थ काढून त्यावर टीका करण्यात हुशार असणारे ओवैसी !

कर्नाटकमध्ये होणार्‍या गोहत्या बंदी कायद्याची गोव्यातील गोमांस भक्षकांनी घेतली धास्ती !

कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रखर गोभक्त तथा गोवंशियांच्या रक्षणासाठी झटणारे भाजपचे नूतन गोवा प्रभारी आणि कर्नाटकमधील चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि यांचा मोलाचा हातभार आहे.

भाजप नेत्यांचे विवाह ‘लव्ह जिहाद’मध्ये मोडत नाहीत का ?

मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की, ज्या भाजप नेत्यांच्या परिवारातील लोकांनी अन्य धर्मांमध्ये विवाह केले आहेत, ते ‘लव्ह जिहाद’च्या परिघात येत नाहीत का ? असा प्रश्‍न छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला विचारला आहे.

(म्हणे) ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची आवश्यकता नाही !’ – अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई उपनगर, काँग्रेस

लव्ह जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही. त्यामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले.

बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले.

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.

हिंदुत्व सहिष्णू असल्यामुळे ओवैसींवर भारतात अद्यापपर्यंत आक्रमण झाले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत.