अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा सूड घेणार ! – इराणची इस्रायलला धमकी

इराणसाठी अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणारे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली. या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप करत ‘या हत्येचा सूड घेण्यात येईल’, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे.

आतंकवादी कारवाया करणार्‍या मुसलमान धर्मगुरूचे नागरिकत्व ऑस्ट्रेलियाने काढले !

भारतात गेल्या ३ दशकांत असे कधीच घडलेले नाही, त्यामुळे भारतातील आतंकवादी आक्रमणे रोखता आलेली नाहीत ! भारत जिहादी आतंकवादी संघटनांवर कठोर होणार्‍या अन्य देशांकडून कधी शिकणार ?

इंडोनेशियामध्ये बलात्कार्‍याला चाबकाचे १४६ फटके मारण्याची शिक्षा

इंडोनेशियामध्ये एका लहान मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे १४६ फटके मारण्याच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात आली. शरीयत कायद्यानुसार त्याला ही शिक्षा करण्यात आली.

३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !

इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होणार नाही !

पाकला पुन्हा चपराक ! ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये काश्मीरवर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीसाठी हा विषयच ठेवण्यात आलेला नाही !

‘शॉर्ट्स’द्वारे (तोकडे कपडे) गणपतीचे विडंबन करणार्‍या ब्राझिलच्या आस्थापनाने मागितली क्षमा !

ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही बोध घेतील का ?

मुंबईवरील आक्रमणात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये स्मारक उभारण्यात येणार !

स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

(म्हणे) ‘भारताने चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी !’ – चीनचा आरोप

भारताच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवावे !

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.