१४ एप्रिलपर्यंत मुंबईतील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस बंद रहाणार ! – रेल्वे प्रशासन

मुंबई शहर आणि उपनगर यांमधील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावर एकही रेल्वे धावणार नसून या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे.

केंद्रशासनाकडून ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधावर निर्यातबंदी !

देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे.

सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

सोलापूर येथे ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर गुन्हे शाखेची धाड

येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्‍या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्‍या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागठाणे (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीच्या वतीने बाहेरून आलेल्यांची थेट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणी

मुंबई आणि पुणे येथून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्‍यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने २२ सहस्रांहून अधिक नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली आहे….

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

सोलापूर येथे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे.