रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांनी हाच सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला पाहिजे ! या देशात रहाणार्‍यांनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यासह जे म्हणत आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे; मात्र ममता बॅनर्जी ना ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत, ना अन्य कुणी म्हटले, तर ते त्या स्वीकरत आहेत.

कायमस्वरूपी जागा देण्याची रवि जाधव यांची मागणी मान्य करणे शक्य नाही ! – नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे.

गोवा माईल्स या टुरिस्ट टॅक्सीसेवेविषयी मंत्री मायकल लोबो यांचेच प्रश्‍नचिन्ह !

मंत्री मायकल लोबो म्हणाले, गोवा माईल्स सेवेला दाबोळी विमानतळावर काऊंटर का देण्यात आला आहे ? ही सेवा अ‍ॅपवर आधारित असल्याने प्रवासी अ‍ॅपच्या माध्यमातून या सेवेचा काऊंटरशिवाय सहजतेने लाभ घेऊ शकतात. या सेवेमुळे पारंपरिक टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे…

पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.

रेडी येथील युवकांना रोजगार द्या अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या भूमी परत करा ! – प्रीतेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य

तालुक्यातील रेडी येथील बंद पडलेल्या टाटा मेटालिक कंपनीच्या जागेत नवीन प्रकल्प चालू करा अन्यथा शेतकर्‍यांच्या घेतलेल्या भूमी त्यांना परत करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रीतेश राऊळ यांनी केली आहे.

(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’

केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

सिंधुदुर्गात होणारी गुटखा विक्री तात्काळ बंद करण्याची शासनाकडे मागणी

गुटखा विक्री व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा राज्य सरकारने २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनापासून सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग आणि निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.

घरे वैध करण्यासाठी लागवडीची भूमी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय

गोवा मंत्रीमंडळाची बैठक २५ जानेवारी या दिवशी सकाळी संपन्न झाली. हे दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.

(म्हणे) पणजीवासियांना तरंगते कॅसिनो मांडवीतून बाहेर नेलेले नकोत !

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या संदर्भात स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी त्यांच्या भूमिकेत पालट केला आहे. आमदार बाबुश मोन्सेरात म्हणाले, मांडवीतून तरंगते कॅसिनो अन्यत्र नेल्यास पणजी शहरातील व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे.