मालवणी (मुंबई) येथे पोलिसांनी भगवान श्रीरामाची भित्तीपत्रके फाडली !

हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे २० सहस्र खटले प्रलंबित आणि अनेक पदे रिक्त !

अशा आयोगाचा असून उपयोग तरी काय ? हा सरकारवर भारच आहे. असे आयोग पोसायचे तरी कशाला ? ज्या संस्था चालवता येत नसतील, तर दिखाऊपणासाठी त्या चालवणे म्हणजे सामान्य जनतेला आशेवर ठेवून तिची फसवणूक करणेच नव्हे काय ?

‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.

नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच !’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मांध आक्रमक होता ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.

बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

धावत्या लोकलमधून हिंदु पत्नीला ढकलून देणार्‍या धर्मांधाला अटक

कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्‍या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ?

औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?

औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.