‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच !’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणार्‍या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मादिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्‍नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांचा त्याग, समर्पण यांत होरपळून आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा ! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.’