
पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया नव्याने चालू करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याच्या मते जिल्हा पंचायतीची सध्याची निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारी मासात चालू झाली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारी मासात काढण्यात आली होती आणि यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. शासनाने जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचे घोषित केले आहे; मात्र यासाठी नव्याने अधिसूचना किंवाप्रक्रिया चालू केलेली नाही, तसेच आचारसंहिताही लागू केली नाही. यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक ९ किंवा १६ जानेवारी २०२१ या दिवशी घेतल्यास योग्य होईल, असे मत पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
Bengaluru SIR : बेंगळुरूत ९७ लाखांपैकी ४ लाख मतदार अवैध!