अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत आणि श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही तो वसा चालू ठेवणारे वारकरी !

आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान !

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥

माऊलींच्‍या रथाचे अश्‍व ‘हिरा-मोती’चे पुण्‍यात स्‍वागत !

कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्‍थान झालेल्‍या माऊलींच्‍या दोन्‍ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्‍यात आगमन झाले आहे.

पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे.

पालखी सोहळ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी आळंदीमध्ये ७ ते १२ जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी !

आळंदी शहरामध्ये केवळ वारकरी आणि अत्यावश्यक सुविधा देणारी वाहने यांनाना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.