ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले !

सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी होणार !

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून ११ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे.

सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

‘पंढरपूर कॉरिडॉर’ : पुरातन वास्तूंचे जतन आणि आत्मोन्नतीचे ठिकाण होणे अपेक्षित !

मंदिर परिसरात आजही सहस्रो भाविकांना अत्यल्प दरात रहाण्याची सोय घरोघरी केली जाते. ही घरे पाडल्यास इतक्या भाविकांची रहाण्याची सोय शासन करू शकणार आहे का ?

मंदिरांमधून निधीचा विनियोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी झाला पाहिजे ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी परिषद, कार्याध्यक्ष

ज्याप्रमाणे मदरशातून इस्लामचे शिक्षण दिले जाते, चर्चमधून ख्रिस्त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मंदिरांमधून मिळणार्‍या पैशांचा उपयोग सरकारी कामांसाठी न होता हिंदूंना त्यांच्या मुला-मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी झाला पाहिजे.

संतांना विरोध करणार्‍या जातीयवाद्यांना थारा देऊ नका ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्‍यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.

राष्‍ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या पादुकांचे सातारानगरीत उत्‍साहात स्‍वागत !

दासनवमीच्‍या पार्श्‍वभूमीवर राष्‍ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या पादुका दौर्‍यासाठी निघतात. दौरा संपवून या पादुकांचे नुकतेच सातारा नगरीत आगमन झाले. रामदासस्‍वामी संस्‍थान, सज्‍जनगड येथील पादुका शहरातील काळाराम मंदिर येथे, तर श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्‍जनगड येथील पादुका समर्थ सदन येथे मुक्‍कामी होत्‍या.

पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

संतांविषयी कुणी चुकीचे बोलू नये, यासाठी कायदा करा – देहू संस्‍थानचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांची मागणी

सध्‍या कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, संस्‍कृती, संत, परंपरा यांच्‍यावर वाटेल ते बोलतो. हिंदु संघटित नसल्‍यामुळेच असे होत आहे. सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन आपली ताकद दाखवल्‍यास कुणाचेही असे वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस होणार नाही.

यंदा माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष !

यंदा रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष असल्याने उपस्थित दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.