पशू-पक्षी सहजतेने सद्गुरूंकडे आकर्षित होणे, हे त्यांच्यातील चैतन्याचे द्योतक !

आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.

साधिकेला लाभलेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा चैतन्यमयी सत्संग !

सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.

साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !

लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

चिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’

हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.

तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होतात ! – सद्गुरु स्वाती खाडये

आज हिंदूंचे धर्मांतर होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

इस्लामी पद्धतीचे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर केलेला अन्याय आहे.

आर्थिक जिहादातून हिंदु व्यावसायिकांना संपवण्याच्या षड्यंत्राला रोखण्यासाठी वेळीच सिद्ध व्हा ! – मनोज खाडये

‘हलाल’ हे संकट एवढ्यापुरतेच मर्यादित नसून विविध उद्योगधंद्यांवरही ते घोंघावत आहे. ‘हलाल’ अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत असून हिंदु व्यापारी बांधवांनी या आर्थिक जिहादला तोंड देण्यासाठी वेळीच सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.