(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र आणि शिवप्रेमी यांची क्षमा मागावी !’ – संभाजी ब्रिगेड

‘छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले’, या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचे प्रकरण

पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षांसह ५ जणांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी !

जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.

दहीहंडी, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन !

गणेशोत्सवाविषयी विभागीय पातळीवर अहवाल मागवून पुढील निर्णय घेण्यात येईल. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाविषयी स्वतंत्र अहवाल सिद्ध केला जाईल.

पिंपरी स्थायी समितीमधील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाम !

कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !

भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !

या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना पडताळणीचे अधिकार !

७२७ खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे लक्ष !

राष्ट्र उभारण्याची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित नसून ती त्याच्या संस्कृतीतूनच मिळते ! – आरिफ खान, राज्यपाल, केरळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ खान बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले.

लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने गुलामीची मानसिकता लादली ! – साध्वी प्रज्ञा सिंह, खासदार, भाजप

साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद वाढला. भारतातील वर्णव्यवस्था कर्माच्या आधारे निश्चित केली होती.