पाकिस्तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ
अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे ‘सोव्हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.