शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

खासदार नवनीत राणा यांच्या अटकेला मुंबई सत्र न्यायालयाची तात्पुरती स्थगिती !

खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जातपडताळणी प्रमाणपत्राच्या प्रकरणातील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयात चालू असल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना १९ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील देणगी दर्शन ऐच्छिक ! – उच्च न्यायालय

देवाला दर्शनासाठी भक्तांचे पैसे नाही, तर त्यांचा भाव हवा असतो’, हेच हिंदूंना ज्ञात नसल्याने ते पैसे देऊन लवकर दर्शन घेण्याच्या मागे लागतात ! हिंदूंची ही दयनीय स्थिती पालटण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच यावरून लक्षात येते !

गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

‘मुंबई’ असे नामांतर होऊनही कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ !

वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबे’ शहराचे नामांतर ‘मुंबई’ असे करण्यात येऊनही आजही येथील उच्च न्यायालयाचा कागदोपत्री उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ असाच करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यात ध्वनीचित्रीकरण करणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘पोलीस ठाणे ही जागा गोपनीयता कायद्याच्या अंतर्गत (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही’, असे स्पष्ट करत याविषयीच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हिंदु देवस्थानाच्या भूमी घोटाळाप्रकरणी भूखंड माफियांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे संभाजीनगर खंडपिठाचे आदेश !

जिल्ह्यात हिंदु देवस्थानाच्या भूमीची अवैध हस्तांतरणाची ८ प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आले होते; मात्र पथकाने अहवाल दिल्यानंतरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी संभाजीनगर खंडपिठात धाव घेतली.

श्री सप्तशृंगीदेवीसमोर पशूबळी देण्याच्या परंपरेस पुन्हा प्रारंभ आणि त्यामागील वादविवाद !

बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍या आणि शेकडो गोवंशीय यांच्या हत्या होत असतांना अंनिसवाले अन् पुरो(अधो)गामीवाले कुठे असतात ?

रस्ते उभारणी प्रकल्प तत्परतेने पूर्ण करायला हवा, हे प्रशासनाला का कळत नाही ? हे सांगावे का लागते ?

‘आधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करा अन्यथा रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प यापुढे आम्ही होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले.’   

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रा. साईबाबा निर्दाेष !

शहरी नक्षलवादी आणि देहली विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन्. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दाेष घोषित करण्यात आले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.