शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत ! – मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम

निवडणूक प्रक्रिया चालू असतांना कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाय योजना कराव्यात.

नागपूर येथे ४६ टक्के लोकांनी मतदानाचे कर्तव्य न बजावल्याने जागृत मतदारांनी निषेधाचे फलक झळकवले

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २३ सहस्र २८१ मतदारांपैकी १२ लाख ७ सहस्र ३४४ मतदारांनी मतदान केले. १० लाख १५ सहस्र ९३७ मतदारांनी मतदान केले नाही.

‘ई.व्ही.एम्.’ यंत्राविषयी काँग्रेसला सर्वाेच्च न्यायालयाकडून चपराक ! – पंतप्रधान मोदी

सर्वोच्च न्यायालयाने ‘ई.व्ही.एम्.’द्वारे मतदान घेण्यात येईल, असे सांगत त्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या !

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला. डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नोंद..

Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

सायबर गुन्हे विभाग आवश्यक कारवाई करत आहे आणि यासाठी लोकांनी ही ‘पोस्ट’ पुढे पाठवू नये.

उत्तर-मध्य मुंबईमध्ये भाजपची उमेदवारी उज्ज्वल निकम यांना !

उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

PM Modi In Goa : दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचे संकेत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्ष २०२४ ची निवडणूक २ विचारधारांमधील निवडणूक आहे. लोकांच्या आशाआकांक्षा यांची पूर्तता करण्यासाठी झटणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर दुसर्‍या बाजूने स्वार्थासाठी झटणारी ‘इंडि’ आघाडी आहे !

नांदेडमध्ये युवकाने ई.व्ही.एम्. यंत्रावर कुर्‍हाडीने घाव घातले !

युवक कुर्‍हाड घेऊन मतदान यंत्राजवळ पोचेपर्यंत पोलीस झोपले होते का ?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !

असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्‍या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?

निवडणूक रोखे आणि भ्रष्टाचाराचे धोके !

ऐन ‘लोकसभा २०२४’च्या निवडणुकांच्या पूर्वीच निवडणूक रोखे योजना न्यायालयाने थांबवण्यास सांगितल्यावर विदेशातून अधिक प्रमाणात काळे धन भारतात येऊन निवडणुकांवर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धन कसे थांबवणार ? हा प्रश्न आहे.