दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारी यंत्रणांनी स्वतःहून यावर कारवाई करणे आवश्यक !

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याची, तसेच मंदिर विश्वस्त आणि गड-दुर्ग यांच्या संदर्भात गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी केली.

येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी, १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण केले जावे यांसह राज्यातील खासगी मंदिरांमध्ये भ्रमणभाष बंदी केली जावी, अशी मागणी श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली.

मंदिर रक्षणासाठी संघटित होण्‍याचा वसई येथील मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

१६ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बैठक पार पडली. बैठकीत वसई, विरार, नालासोपारा परिसरातील २९ मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि प्रतिनिधी उपस्‍थित होते.

कोल्‍हापूर येथील मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन आणि अन्‍य प्रश्न सांघिकपणे सोडवणार ! – मंदिर विश्वस्‍त, पुजारी यांच्‍या बैठकीत निर्धार

शाहूपुरी येथील राधाकृष्‍ण मंदिर येथे मंदिरांच्‍या विविध प्रश्नांसाठी, तसेच व्‍यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने एक बैठक घेण्‍यात आली. त्‍या बैठकीत हा निर्धार करण्‍यात आला. या बैठकीसाठी २१ मंदिरांचे ३० विश्‍वस्‍त, पुजारी, पदाधिकारी उपस्‍थित होते.

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अक्‍कलकोटसह ५ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे उत्‍साहात साजरे !

सध्‍या हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांचे धर्मांतर केले जात आहे. त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले जात आहेत. हे थांबवण्‍यासाठी हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्‍यक आहे.

हिंदु जनजागृती समिती देत असलेले धर्मशिक्षण घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देऊ !  

भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्‍हा सोलापूर) येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’त करण्‍यात आली.