श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, तर डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !

मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !

सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये साकारणार शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळीचे देखावे !

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाकडून स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीचे निकष आणि गुणांची वर्गवारी घोषित केली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळ यांविषयीचे देखावे निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी सर्वांधिक गुण ठेवले आहेत.

यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळ प्रयत्नशील रहाणार आहे.

गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा !

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव कालावधीत दाखलप्रविष्ट झालेल्या खटल्यात राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी निर्दाेष !

वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत प्रविष्ट झालेल्या खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालीमेचे कार्यकर्ते यांची जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली.

गणेशोत्सवातून लोकमान्य टिळक यांचा हेतू साध्य होण्यासाठी जनजागृती करूया ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी हिंदूंचे संघटन केले. हा उद्देश गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावा !

कोकण रेल्वेचे श्री गणेशचतुर्थीसाठीचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

केंद्रीय मंत्री राणे यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होऊन कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.