राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद
राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.