युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे वक्तव्य
श्रीनगर – ‘युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’ने (यू.के.पी.एन्.पी.ने) आरोप केला आहे की, पाकिस्तानमध्ये काश्मिरींना वेचून ठार मारले जात आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे प्रतिदिन काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे; मात्र आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आणि पीडित कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत.
पाकव्याप्त काश्मीरमधील समहनी, भिंबर येथील रहिवासी चौधरी दानिश यांना नुकतेच एका कारखान्यात काम करत असतांना गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेचा संदर्भ देतांना, ‘यू.के.पी.एन्.पी.’च्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे काश्मिरींची सुरक्षा हा गंभीर चिंतेची विषय बनला आहे. ते म्हणाले की, वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.
सौजन्य:R.Digital
संपादकीय भूमिकाभारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ? |