किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा !
शहरातील प्रतिदिनच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी करण्याच्या मानसिकतेमुळे किल्ले सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपी राजरोसपणे धिंगाणा घालतांना दिसत आहेत.
शहरातील प्रतिदिनच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी करण्याच्या मानसिकतेमुळे किल्ले सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपी राजरोसपणे धिंगाणा घालतांना दिसत आहेत.
खरेतर पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे होते. येथे पोलिसांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला !
विषारी दारू विकली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?
जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात.
ट्रकने आलेला ५०० पेट्या मद्यसाठा पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यात आला असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमात आहे.
अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती.
अवैध मद्याची वाहतूक करणार्यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्चर्य ते काय ?
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात केलेल्या कारवाईत ३ लाख ३६ सहस्र रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा गाडी, असा एकूण ८ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.