सांगली येथील मोकळ्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण उठविण्याचे राज्यशासन आणि महापालिका प्रशासन यांचे कारस्थान ! – विजय नामजोशी

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान या संस्थेस सलग १३ वर्षे मालकी हक्क आणि ताबा असलेली विश्रामबाग येथील भूमी माध्यमिक शाळा म्हणून आरक्षित आहे.

कोल्हापूर येथे इंग्लंड अथवा परदेशातून आलेला एकही प्रवासी अद्याप कोरोनाबाधित नाही

कोल्हापूर येथे इंग्लंडहून आलेल्या एकूण ६२ व्यक्तींची जिल्हा आरोग्य यंत्रणेने पडताळणी केली आहे. यांपैकी ५९ व्यक्तींच्या कोरोना चाचणी अहवालात ते सर्व कोरोनाबाधित नाहीत, असे आढळले आहे.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मुखदर्शनास आजपासून प्रारंभ!

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून  पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.

सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्याने, प्रशासनाला निवेदन देणे आदी माध्यमांतून ३१ डिसेंबरच्या विरोधात चळवळ

नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !

उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !

दुसर्‍या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्‍या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन आणि अन्य उपक्रम

हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !

‘चांदा ते बांदा’ योजना बंद करून महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गची हानी केली ! – रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते

राज्य सरकारने विकासासाठी निधी दिला तर नाहीच, उलट यापूर्वी आलेला निधीसुद्धा परत घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आणलेल्या ‘चांदा ते बांदा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला विद्यमान सरकारने तिलांजली दिली.

गोव्यात ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला रात्रीची संचारबंदी नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गोव्याच्या आरोग्य खात्याला एक पत्र प्राप्त झाले आहे त्यानुसार संचार बंदीचा प्रस्ताव ठेवला होता – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे