मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु आणि प्र. कुलगुरु यांच्यासाठी खरेदी केलेल्या महागड्या गाड्यांच्या प्रकरणी चौकशी !

मुंबई विद्यापिठाचे कुलुगुरु प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांच्यासाठी ६० लाख रुपयांहून अधिक व्यय करून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांच्या प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी केली.

‘खान’ आडनाव असल्यामुळे आर्यन पीडित ठरतो का ? – आमदार नीतेश राणे, भाजप

भाजपच्या नेत्यांनी आणलेल्या दबावामळे ३ आरोपींना सोडून देण्यात आले’, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी केला आहे. त्याला नीतेश राणे यांनी ‘ट्वीट’ करून उत्तर दिले आहे.

पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात बातमी दिल्याच्या रागातून पुणे येथील पत्रकाराची हत्या करणार्‍यास ५ वर्षांची शिक्षा !

आरोपीने मृत पत्रकाराच्या घायाळ भावाला ३० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पंचमीला श्री महालक्ष्मीदेवीची गजारूढ अंबारी रूपात अलंकार पूजा, तर जोतिबा देवाची पंचदल कमळ पुष्पातील राजदरबारी राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महाअलंकारिक महापूजा !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थितीत ललितापंचमीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवी आणि त्र्यंबोलीदेवी भेट यात्रा पार पडली.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे भाविकांनी सशुल्क दर्शनाकडे पाठ फिरवली !

नवरात्रोत्सवाच्या तिसर्‍या-चौथ्या दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार पूजा भाविकांसाठी खुली होती.

श्री तुळजाभवानीदेवीची मुरली अलंकार महापूजा !

येथे शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली.

आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यावरच मी पुराव्यानिशी बोलेन ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मी कुठेही पळून जाणार नाही, तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. यासंदर्भात मला कोणतीही सूचना, नोटीस आलेली नाही. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी संपली की, मी पुराव्यानिशी बोलेन’, अशा शब्दांत आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.

उजनी धरणातून कालव्याद्वारे भीमानदीत ५ सहस्र क्युसेक्स पाणी सोडले !

पाणी सोडल्याने भीमानदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

मराठवाडा येथील अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ ! – कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची घोषणा

अतीवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे झालेली प्रचंड हानी पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे १० सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. अधिसभेचे सदस्य अधिवक्ता संजय काळबांडे यांनी विद्यापिठाच्या अधिसभेत ही मागणी केली होती. त्याला इतरांनी पाठिंबा दिला.

अभिव्यक्तीहून धार्मिकता महत्त्वाची !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले.