बाणावली येथे ‘धिर्यो’चे आयोजन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेऊन २० मिनिटांत सोडले

बाणावली येथे १६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘धिर्यो’च्या (बैलांची झुंज) आयोजनावरून कोलवा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. पोलिसांनी ‘पिपल फॉर अ‍ॅनिमल्स’ (पी.एफ्.ए.) या प्राणीप्रेमी संघटनेच्या तक्रारीची नोंद घेऊन ही कारवाई केली.

वारकर्‍यांना मठाबाहेर काढल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची चेतावणी

माघ यात्रेसाठी शहरातील काही मठ आणि धर्मशाळा येथे यापूर्वीच आलेल्या भाविकांना मठाबाहेर काढू नये, वारकर्‍यांना मठ आणि धर्मशाळा येथून बाहेर काढण्यास पोलिसांनी बळजोरी केल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे.

आतंकवादाचा बीमोड कधी ?

भारतातील आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे निःस्वार्थी आणि प्रखर राष्ट्रभक्त असणारे शासनकर्ते आवश्यक आहेत, हेच खरे !

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा मोठा वाटा !

‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !

साखर कारखाना उसाची तोडणी करत नसल्याने शेतकर्‍याने उसाच्या शेताला लावली आग !

करंजगावातील शेतकर्‍यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला, तर राजकीय विरोधातून ही ‘स्टंटबाजी’ केली जात आहे, असे साखर कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ ई-रिक्शा भेट !

दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्‍या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला.

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाची आरोग्य विभागाकडून तपासणी

राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे.

हानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देऊ ! – कृषीराज्यमंत्री

गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून गर्दी जमवणार्‍या भाजपच्या २ पदाधिकार्‍यांसह ‘डी’ मार्टवर गुन्हा नोंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सनातनचे साधक श्री. गजानन लोंढे यांना धर्मरथावर सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘आता धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी धर्मरथाचे चित्रीकरण करायला, तसेच त्याची छायाचित्रे काढायला सांगितले. हे वृत्त मला आणि सहसाधकांना समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू आले.