कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

नगरसेवक युवराज बावडेकर यांचे गटनेता आणि सभागृह नेते पदाचे त्यागपत्र

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह आणि गटनेते युवराज बावडेकर यांनी पक्षाचा आदेश प्राप्त झाल्याने दोन्हींचे त्यागपत्र दिले. हे त्यागपत्र बावडेकर यांनी महापालिका जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे सोपवले.

जीएसटी तरतुदींविरोधात निषेध आंदोलन ! – ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे

जीएसटीतील तरतुदींविरोधात २९ जानेवारी या दिवशी देशभरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात जीएसटी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येईल, – ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे

रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प लवकर चालू करणार – गृहमंत्री

राज्यात ९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकर चालू करून या माध्यमातून सायबर गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

श्री बोडगेश्‍वरदेवाच्या जत्रोत्सवातील कार्यक्रम

बुधवार, २७ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात येणार आहे.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !

नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पहिल्यांदाच पशुपतिनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

नेपाळची सत्ता हातातून निसटू पहात असल्याने आता कम्युनिस्टांनाही देव आठवू लागला आहे ! ओली यांच्या या दिखाऊपणाला नेपाळी हिंदूंनी न भुलता राजेशाही आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे !