राज्यपाल निधीतून पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

८ जानेवारी या दिवशी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून १० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना राज्यपाल निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेचे आवाहन

बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून तीनही कृषी कायद्यांना स्थगिती !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांना पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली आहे. कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

म. गांधी यांच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली !

हा इतिहास आहेच; मात्र भविष्यात भारताची फाळणी होऊ नये, यासाठी शासनकर्ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगायला हवे !

शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्प रहित करा ! – विश्‍वजित राणे

आरोग्यमंत्री आणि सत्तरी तालुक्याचे आमदार विश्‍वजित राणे यांनी शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला असलेला त्यांचा पाठिंबा काढून हा प्रकल्प रहित करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

संशयावरून आरोपीला अटक करणे, हा शेवटचा पर्याय असावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील पोलीस या नियमाचे प्रतिदिन उल्लंघन करून शेकडो घटनांत निरपराध्यांचा छळ करत असतात ! सनातनच्या काही निर्दोष साधकांनी ४ वर्षे हा छळ भोगलेला आहे. हे लक्षात घेता न्यायालयाने अशा पोलिसांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !

साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.

‘सनातन प्रभात’ नियतकालिके आता सुप्रसिद्ध ‘डेली हंट’ ‘न्यूज अ‍ॅप’वरही उपलब्ध !

‘डेली हंट’ हे भारतातील सर्वांत लोकप्रिय ‘न्यूज अ‍ॅप’ असून ते १४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतासमवेतच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे देश, तसेच आफ्रिका खंडातही हे अ‍ॅप वापरले जाते, ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांमधील लेख/वृत्ते वाचता येणार आहेत.

परदेशातील पक्ष्यांमुळे परभणी येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव ! – प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय 

मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्‍यावर येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.

‘बर्ड फ्ल्यू’मुळे मुरुंबा (जिल्हा परभणी) गावात संचारबंदी लागू

मुरुंबा गावात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनुमाने ८०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हा आजार पसरू नये; म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात संचारबंदी लागू केली आहे.