
मुंबई – बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. यासाठी तात्काळ प्रतिसाद पथकातील डॉ. हर्षल भोईर (९९८७२८०९२१) आणि डॉ. अजय कांबळे (९९८७४०४३४३)यांचे क्रमांक पालिकेने घोषित केले आहेत.

हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे त्या विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यरत साहाय्यक अभियंता यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर विभाग कार्यालयातील त्या अधिकार्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी या पक्षांची विल्हेवाट मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लावणार आहेत.
आतापर्यंत देशातील १० राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, देहली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र येथे बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे.
कुंभपर्वासाठी ३४ सहस्र ७३२ कोटी रुपयांचे प्रावधान – उदय सामंत, उद्योगमंत्री
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !