म. गांधी यांच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली !

मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्‍वर शर्मा यांचे विधान

  • हा इतिहास आहेच; मात्र भविष्यात भारताची फाळणी होऊ नये, यासाठी शासनकर्ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगायला हवे !
  • देशाची फाळणी होऊ नये म्हणून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा, गोहत्याविरोधी कायदा, लव्ह जिहादविरोधी कायदा सरकारने केला पाहिजे, तसेच जिहादी आतंकवादी संघटना, तसेच देशद्रोही घटक यांच्यावर बंदी घातली पाहिजे !
गांधीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

भोपाळ (मध्यप्रदेश) – नावामुळे गैरसमज सिद्ध होत असतात. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार महंमद अली जिना यांच्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचे विभाजन केले. वर्ष १९४७ मध्ये बापूंकडून (गांधी यांच्याकडून) चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले.

तसे विभाजन सिंह करत आहेत, असे विधान मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी येथील गांधीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.