अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

काबूलमधील गुरुद्वारावरील आक्रमणामागे आय.एस्.आय.चा हात

येथील गुरुद्वारावर २ दिवसांपूर्वी झालेल्या आक्रमणानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुद्वारापासून ३ कि.मी. अंतरावर असणारे भारतीय दूतावास आतंकवाद्यांचे लक्ष्य होते

बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.

मुंबई ते झारखंड विनाअनुमती प्रवास करणारे १५ प्रवासी कह्यात

दळणवळण बंदी लागू करून ४-५ दिवस उलटले, तरी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन चालूच असणे, हे गंभीर आहे. पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार

कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्‍यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.

एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्‍या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?

‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही !’ – आयरिश रॉड्रीग्स

सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?

‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही