देशातील सर्व नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा.
गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.
भारतामध्ये ३० जानेवारी या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याला त्याची लागण होऊन तो केरळमध्ये परतला होता. आता सध्याच्या स्थितीत भारतात ८०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशात सातत्याने अशा घटना घडूनही त्याविषयी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी काही बोलत नाहीत कि अशांना घरातच रहाण्याचे आवाहन करत नाहीत कि नियमांचे पालन करण्यासही सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क…
कोरोनाशी लढण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’साठी तब्बल ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. साहाय्यासाठी आजपर्यंत जमा झालेल्या रकमेपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना पोलीस आणि प्रशासन यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणार्यांची संख्या वाढली आहे.
भ्रमणभाष, संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याद्वारेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतील, तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो.