स्थलांतर करणार्‍या परप्रांतीय कामगारांची सर्व व्यवस्था करा ! – केंद्र सरकार

देशभरात दळणवळण बंदीमुळे विविध शहरांतूून सहस्रोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. याची गंभीर नोंद घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांची सर्व व्यवस्था करण्याचा आदेश दिला.

कोरोना रुग्णांविषयी अफवा पसरवल्याप्रकरणी नागपूर, रायगड, पुणे येथे ८ जणांवर गुन्हा नोंद

कोरोनाविषयी जनजागृती करून समाजातील लोकांना साहाय्य करण्याऐवजी समाजात अफवा पसरवून लोकांना भयभीत करणारे समाजद्रोहीच आहेत ! त्यामुळे अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी !

कोरोनामुळे जगभरात वर्ष २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी येईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आर्थिक हानीचा फटका बसला आहे. त्यामुळे विकसनशील देशांना साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

देहलीतील इस्लामी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या शक्यतेवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले  धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दादर येथील भाजीबाजार बंद ठेवण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दादर (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर भरणारा भाजीबाजार २९ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तसा आदेश पालिकेकडून देण्यात आला आहे.

आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीप्रगत देशांत कोरोनामुळे सहस्रावधी बळी जात आहेत. त्यामुळे ‘आपल्याला काही होणार नाही’, या भ्रमात राहू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.

मुंबई ते झारखंड विनाअनुमती प्रवास करणारे १५ प्रवासी कह्यात

दळणवळण बंदी लागू करून ४-५ दिवस उलटले, तरी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन चालूच असणे, हे गंभीर आहे. पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करायला हवी !