भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्या युद्धाभ्यासामुळे डॉ. स्वामी अप्रसन्न !
याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करून भारतियांना आश्वस्त करणे आवश्यक !

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि बलुचिस्तानला पाकपासून स्वतंत्र करणे, हे आता विसरून जा, असे उत्तर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका प्रश्नावर ट्वीट करून दिले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली होती. त्यावर डॉ. स्वामी यांनी वरील उत्तर दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्या युद्धाभ्यासावर डॉ. स्वामी अप्रसन्न असल्याचे सांगितले जात आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो पुन्हा मिळवण्याकरता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. कलम ३७० हटवल्यानंतर भारत त्या दिशेने कृती करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती.
How nice. Forget now recovering PoK and liberating Baluchistan. https://t.co/s9sA0tAWEx
— Subramanian Swamy (@Swamy39) March 29, 2021
काही दिवसांपूर्वी डॉ. स्वामी यांनी ट्वीट करत, चीन आणि पाकिस्तान यांच्याविषयीच्या धोरणांमुळे नेपाळ, भूतान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप केला होता.
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक