अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान ४ आठवडे व्हावे ! – देवेंद्र फडणवीस

अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मांडले. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी अल्प केला, तर प्रश्‍नांपासून पळ काढण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल, असा आरोप त्यांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिकेचा ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संमत

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी महापालिकेचा वर्ष २०२०-२१ चा सुधारित आणि वर्ष २०२१-२२ चा मूळ ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प संमत केला.

…तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल ! – पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगरकरांना चेतावणी

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याला ५ लाख रुपयांच्या कोकीनसहीत अटक

ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.

तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा येथे मशिदीच्या परिसरात भगवा झेंडा लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

१७ फेब्रुवारीला रात्री ९.१५ वाजता रामकृष्णनगर येथील युवक शिवजयंतीची सिद्धता करत होते. त्या वेळी दिलीप काळभोर यांनी मनात कोणतीही द्वेषभावना न बाळगता मशिदीच्या परिसरात असणार्‍या लोखंडी खांबावर भगवा झेंडा लावला

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन  

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांची विरोधक सातत्याने करत असलेली अपकीर्ती थांबबावी, यासाठी बंजारा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन दिले.

सनातनची साधिका कु. प्रणिता दिवटे लेखापरीक्षक (ग्रुप १) परीक्षेत उत्तीर्ण

या यशाविषयी कु. प्रणिता म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना नामजप, तसेच अत्तर-कापूर यांचे उपाय नियमित केले. याच समवेत नियमित प्रार्थनाही करते. केवळ ईश्‍वरी कृपा आणि गुरुदेवांचा आशीर्वाद यांमुळे हे शक्य झाले.’’

पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार ! – तृप्ती देसाई

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये २४ घंट्यांसाठी संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत २४ घंट्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यात्राकाळात भाविकांना शहर प्रवेश बंदी असणार आहे