पूर्वजांंनी राखलेल्या भूमी आमच्याच, सरकारच्या नाहीत ! – सत्तरीतील लोकांचा दावा

विश्‍वजित राणे यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी व्यासपिठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे आव्हान या वेळी सत्तरी तालुक्यातील नागरिक आणि अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी विश्‍वजित राणे यांना दिले.

आमदार केसरकर यांच्या आश्‍वासनानंतर रवि जाधव यांचे उपोषण मागे

नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.

कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

पिंगुळी-गुढीपूर येथील परशुराम गंगावणे ! ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.

लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित !

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना त्यांच्या विशेष कामगिरीविषयी राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ४० जणांना हे पदक घोषित झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सावंत हे एकमेव आहेत.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

(म्हणे) ‘शेतकरी उठला तर तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय रहाणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्‍यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !

अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना अनेकदा पैसे दिल्याचा पुरवणी आरोपपत्रात पोलिसांचा दावा

पोलिसांना दिलेल्या जबाबात दासगुप्ता यांनी सांगितले, ‘‘रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकचे रेटींग मिळावे, यासाठी मी माझ्या टीमसमवेत काम करायचो आणि टी.आर्.पी.मध्ये फेरफार करायचो.

विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो.