राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मपुरी (तेलंगाणा) येथे ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

भाग्यनगर (तेलंगाणा) – आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्यावर ईश्वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्मरण केल्याने अत्यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी अधिकाधिक नामस्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन धर्मपुरी येथील भारतीयम् सत्यवाणी यांनी केले. राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चंदानगरच्या धर्मपुरी येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ आयोजित केली होती. त्यात त्या बोलत होत्या. या सभेला राष्ट्रीय शिवाजी सेनेचे श्री. श्रीनिवास चारी आणि समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले. राष्ट्रीय शिवाजी सेनेच्या धर्मकार्याचा परिचय श्री. वेणुगोपाल यांनी करून दिला.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !