‘कर्णावती (गुजरात) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीला श्रीपाद हर्षे, म्हणजेच हर्षेमावशी (वय ८१ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांच्यातील गुण आणि सेवेची तळमळ पाहून मला त्यांच्याविषयी पुढील कविता सुचली.

आढावा घेत आहेत आमच्या हर्षेमावशी ।
सदैव त्यांच्या मनात असते तळमळ ।
साधकांचा आढावा घेण्याची ॥ १ ॥
त्यांच्या वक्तशीरपणामुळे ।
ओढ लागली आम्हा व्यष्टी साधनेची ।
तळमळ आहे त्यांना ।
आम्ही लवकर गुरुचरणी जाण्याची ॥ २ ॥
प्रत्येक प्रसंगात योग्य दृष्टीकोन देऊन ।
साधनेत आमचा उत्साह वाढवती ।
साधनेत साहाय्य करणार्या ।
अशा आमच्या प्रेमळ हर्षेमावशी ॥ ३ ॥
प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने ।
त्यांची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होऊ दे ।
अन् त्या संतपदी विराजमान होऊ देत ।
हीच प्रार्थना गुरुचरणी असे । ४ ॥’
– सौ. गीता धारप, कर्णावती, गुजरात. (१८.११.२०१९)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !