श्री तुळजाभवानीदेवीचे प्राचीन दागिने गहाळ केल्याच्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा नोंद !
मृतांवर आता गुन्हा नोंदवून काय उपयोग ? प्रशासनाने या सर्वच कारवाईला विलंब केला. मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय !
मृतांवर आता गुन्हा नोंदवून काय उपयोग ? प्रशासनाने या सर्वच कारवाईला विलंब केला. मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय !
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री तुळजापूर येथील भवानीदेवीचा प्राचीन १ किलो सोन्याचा मुकुट गायब, दुर्मिळ दागिन्यांच्या वजनांमध्ये तफावत याविषयी तत्काळ आदेश देऊन ती तक्रार नोंद करण्यास सांगतो, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये १९ डिसेंबर या दिवशी सांगितले. याविषयी आमदार महादेव जानकर यांनी औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. सौजन्य झी … Read more
सरकारी झालेल्या मंदिरांतील सोन्या-चांदीचे दागिने हरवणे, मंदिरांच्या भूमी ‘गायब’ होणे, मंदिरांत भ्रष्टाचार होणे, त्यांची संपत्ती लुटणे आदी सर्व मंदिरांच्या सरकारीकरणाचेच दुष्परिणाम आहेत ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असण्यासाठी भक्तांनी आग्रही राहिले पाहिजे !
‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू.
मंदिरांचे सरकारीकरण करून समस्या सुटत नाहीत, उलट त्या ठिकाणी सरकारी लोक अनेक पटीने भ्रष्टाचार करतात, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही निधर्मी सरकारला मंदिर कह्यात घेण्याचा किंवा ते चालवण्याचा अधिकार नाही.
मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून सातत्याने उद़्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमुळे येथील दरडोई उत्पन्न अत्यंत अल्प आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी (अतीमहनीय व्यक्ती) दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ चालू असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. व्हीआयपी रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही चित्रण यांमध्ये तफावत आहे.
मंदिर प्रशासनाने स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्तांसाठी गैरसोयीचे होणार आहे.